Thursday, December 31, 2015

एका हातात बॉम्ब दुसर्‍या हातात गीता

''आम्हाला वारंवार एक प्रश्‍न विचारला जातो आणि तो अनेक दशके विचारला गेलेला आहे की, भारताने गेल्या हजारो वर्षांच्या वाटचालीमध्ये आपला भूभाग विस्तारित का केलेला नाही किंवा जगामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा  प्रयत्न का केला नाही ? त्याचे उत्तर आपण देऊ शकत नसलो तरी काही नामवंत अभ्यासकांनी ते दिलेले आहे. भारतीयांच्या विस्तार न करण्याच्या प्रवृत्तीमागे त्याची मानसिकता दडलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना हे विद्वान लोक भारतीयांची सहिष्णुता, बेशिस्त, कोणाचाही बदला न घेण्याची किंवा सूड न घेण्याची भावना, परकीयांना आपल्यात सामावून घेण्याची लवचिकता आणि आक्रमणापेक्षा स्वसंरक्षणाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती याकडेे बोट दाखवतात.''
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी सहलेखक एस. वाय. राजन यांच्या सहकार्याने 1998 साली लिहिलेल्या ‘इंडिया व्हिजन 2020 - अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या पुस्तकात वरील प्रतिपादन केलेले आहे. डॉ. कलाम यांनी या पुस्तकात हा विषय फार सखोलपणे मांडलेला आहे.
भारतीयांच्या या सार्‍या  मनोवृत्तीचे मूळ त्यांच्या गोंधळलेल्या मनःस्थितीत असते आणि ही गोंधळलेली मनःस्थिती ही आपली राष्ट्रीय प्रवृत्ती आहे. युध्दाचा त्याग करणारा राजा अशोक हा आपल्या देशातल्या जनतेचा आदर्श राजा झाला तेव्हापासूनची अनेक शतके भारतीयांच्या मनःस्थितीला हा संभ्रम वेढून राहिलेला आहे.

Saturday, July 4, 2015

Sunday, June 7, 2015

विवेक विचार जून २०१५ / योग विशेषांक

विवेक विचार
जून २०१५ चा
संपूर्ण अंक
वाचण्यासाठी
पुढील लिंकवर क्लिक करा...
विवेक विचार जून २०१५

Thursday, April 30, 2015

'विवेक विचार' च्या वतीने रविवारी भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान

प्रतिनिधी । सोलापूर
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी (३ मे) सायंकाळी ६.३० वाजता डफरिन चौकातील ज्ञानप्रबोधिनी येथे व्याख्यान होणार आहे. "मीडिया - घडवणारी आणि बिघडवणारी' हा व्याख्यानाचा विषय आहे. विवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक विवेक विचारच्या वतीने "विमर्श' उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होत असल्याचे कार्यक्रमप्रमुख शंकर पेद्दी यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख डाॅ. रवींद्र चिंचोलकर असतील. यावेळी विवेक विचारच्या गोधन विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. आचार्य गोविंददेव गिरी महाराज हे या विशेषांकाचे अतिथी संपादक आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पेद्दी यांनी केले.
भाऊ तोरसेकर

Monday, April 13, 2015

तेरेसा म्हणायच्या, मी माझ्या पद्धतीने धर्मांतरे घडवतेय !

भारतातल्या तथाकथित पुरोगाम्यांची आणि विवेक पिसाटांची शोकांतिका काय आहे, माहितीये? ते सातत्याने या देशातील बहुसंख्यकांच्या श्रद्धा पायदळी तुडवण्यासाठीच उभे असतात. मग सारे जगजरी त्यांच्या म्हणण्याच्या विरोधात असले तरीही चालेल, पण ही गमतीदार मंडळी हटवादीपणाने आपल्याच म्हणण्याला चिकटून राहतात. यातून त्यांचे अंतिमतः हसे होणेदेखीलठरलेलेच असते. आता परवा सरसंचालकांनी केलेल्या वक्तव्याचेच उदाहरण घ्या. 
----------------------