Tuesday, January 6, 2009

मोठ्या लोकांची क्षुद्रता


लोकभावनांच्या सोबत राहण्याऐवजी त्यांनी म्हटले की, ते आता उशाशी पिस्तुल ठेवून झोपतात. प्रसिद्ध चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी एका इंग्रजी पत्रिकेला दिेलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावरून लक्षात येते की, जेव्हा तुम्ही समाजाच्या एका घटकाला कोपऱ्यात ढकलता, तेव्हा तो असहायपणे उग्र प्रतिक्रिया व्यक्त करतो. अर्थात्‌ 26 नोव्हेंबरचा हल्ला, संत्रस्त आणि दुखविण्यात आलेल्या त्या घटकाची उग्र प्रतिक्रिया होती? परंतु, इथे हे देखील सांगितले पाहिजे की, अनेक वरिष्ठ आणि "पेजथ्री'च्या "पार्टी-सर्कल'मधील नायक, लेखक-लेखिका या मुद्द्यावर असामान्य देशभक्तीसह समोर आले आहेत. त्यात शोभा डे सारखी लेखिका अग्रेसर होती. खरे म्हणजे, मुंबई आणि देशाच्या मुद्द्याला "सोशल एलिट' वर्तुळात शोभा डे यांनी सर्वात ठामपणे आणि तीव्रतेने मांडले. तिकडे मुंबईवरील हल्ल्याला "हिंदू-ज्यू' षड्‌यंत्र संबोधून नकारात्मक भूमिकेत जगण्याची धडपड करणाऱ्या मुसलमानांना "कॉवर्ट' नियतकालिकाचे संपादक एम. जे. अकबर यांनी लाथाडलेच. मुंबईवरील आक्रमकांना दहशतवादी न संबोधता केवळ बंदूकधारी म्हणणाऱ्या बीबीसीला, एम. जे. अकबर यांनी मुलाखत देण्यासही नकार दिला.
अंतुलेच नाही तर, ज्यांनी "सिमी'वरील बंदी उठविण्याची मागणी केली होती त्या लालू आणि पासवानसारख्या मंत्र्यांना सरकारात ठेवून, कॉंग्रेस पक्ष देशभक्तांच्या नजरेत गुन्हेगार ठरला आहे. दिल्लीतील बाटला हाऊस प्रकरणात कॉंग्रेेसने शहीद सुरक्षा जवानांचा अपमान केला आणि मुसलमानांची देशभक्ती व सामाजिक समन्वयाच्या भावनेला सर्वसामान्यांच्या दृष्टीने संदिग्ध बनवून टाकले. जिहादी आक्रमकांच्या समर्थनार्थ दिलेल्या अंतुले यांच्या वक्तव्यामुळे भारतातील मुसलमान खरेच खुष होतील? अगदी असेच वर्तन, बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी गोध्रा कांडाच्या चौकशीचे पाखंड रचून करण्यात आले होते. यात हिंदूंनाच स्वत:च्या व स्वत:च्या मुलांच्या हत्येचा कट रचल्याचे दोषी ठरवून मुस्लिम दहशतवाद्यांच्या बचावाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. तेव्हा देखील कॉंग्रेस आणि लालूसारख्या सेक्युलर नेत्यांना वाटत होते की, गोध्राच्या मुस्लिम दहशतवाद्यांचा बचाव करून ते मुस्लिम मतदारांची मते घेऊ शकतील. अशा जातीय द्वेषयुक्त कृत्यांच्या विरोधात खुद्द मुस्लिम नेत्यांनीच उभे होऊन या राजकारण्यांपासून मुस्लिम समाजाला वेगळे करायला हवे होते, परंतु दुर्दैव हे आहे की, ते देखील अशा बाबतीत मौनी राहतात.
एवढेच नाही तर, दहशतवादासारख्या मुद्द्यावर जातीय राजकारणाचा रंग असा काही उधळला जातो की, त्यामुळे पाकिस्तानलाच मदत मिळते. उदाहरणार्थ, दिल्लीतील दोन उर्दू वृत्तपत्रांनी लिहिले आहे की, मुस्लिमांना बदनाम करण्यासाठीच "हिंदू, ज्यू आणि अमेरिकी' संगनमताने मुंबईवरील हा हल्ला करण्यात आला होता. एका दैनिकाची तर, ज्या तालिबानी विमान अपहरणकर्त्यांनी कंधारला पळवून नेलेल्या विमानातील 200 प्रवाशांना (एक सोडून) ठार केले नाही, जर मुंबईच्या आक्रमकांनाही त्यांच्यासारखेच जिहादी म्हणून सांगण्यात येत आहे तर, काय खरेच त्यांनी 200 लोकांना मारले असेल? म्हणून याची चौकशी व्हायला हवी, असे लिहिण्यापर्यंत मजल गेली.
मुंबईवरील आक्रमणाबाबत जेथे संपूर्ण भारत संकल्पबद्ध दिसत आहे, तिथे उर्दू वर्तमानपत्रांच्या एका वर्गाचे अशा प्रकारचे भ्रमोत्पादक स्वर कुठले संकेत देत आहेत?
आणखी एक उदाहरण क्रिकेटचे आहे. पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या संदर्भात भारतातील प्रत्येक वैचारिक सीमारेषेच्या पल्याडचे मतैक्य आहे. भाजपा, कॉंग्रेस एवढेच नाही, तर परराष्ट्र मंत्रालय देखील एका स्वरात बोलत आहे परंतु, क्रिकेटचे खेळाडू असे काही मौनी आहेत की, जणू काही सरकार आणि राजकीय पक्ष त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास भाग पाडत आहेत. पाकिस्तानच्या आक्रमकांच्या संदर्भात सर्वसामान्य भारतीयांनी ज्या तीव्रपणे आपला आक्रोश प्रकट केला, ती तीव्रता सचिन, सौरभ, इरफान पठाण आणि सेहवाग इत्यादींच्या वक्तव्यात कधी कुणाला दिसली का? हे क्रिकेट खेळाडू काय परग्रहावरचे निवासी आहेत काय की, जे मुंबईवरील जिहादी हल्ल्यांना दोन देशांमधील राजकीय मामला मानून स्वत:ला त्याच्या परिघाबाहेरचे "क्रिकेट विश्वाचे असंबद्ध नागरिक' मानतात? ज्या भारतीय जनतेच्या प्रेमामुळे आणि तिरंग्याच्या रंगात रंगलेल्या आत्मीयतेमुळे ऐश्वर्यपूर्ण आणि यशस्वी जीवन जगणाऱ्या या खेळाडूंचा, त्याच भारतीयांच्या वेदनेशी, दु:खाशी आणि आक्रोशाशी काहीच संबंध नाही?
अंतुले यांचे वक्तव्य आणि पाकिस्तानशी खेळण्याच्या संदर्भात क्रिकेट खेळाडूंच्या मौनाने हाच संकेत दिला आहे की, वैभवशाली वर्गाचा देश आणि त्यांची देशभक्ती त्यांच्या निहित स्वार्थाच्या नकाशापुरतीच सीमित असते. या खेळाडूंनी क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे गुळमुळीत समर्थन करून, विक्रमासाठी आपल्या स्वत:ला भलेही नोंदणीकृत केलेले असो; परंतु ते तिरंग्याच्या ध्वजवाहक नागरिकाच्या नात्याने प्रखर भावाने अग्रभागी दिसले नाहीत. ते कुठल्या देशाचे नागरिक आहेत? आणि मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या क्रूरतेचे बळी ठरले, ते कुठल्या देशाचे होते?
जनतेच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी अराजकीय नेतृत्व समोर येण्याची हीच वेळ आहे. आमचे साधू, संन्यासी, मुल्ला-मौलवी आणि पादरी भारताचे नागरिक नाहीत की काय? मंदिर, मशीद आणि चर्च भारतापेक्षा मोठे होऊ शकतात काय? चर्च, मशिदी आणि मंदिरांमधून भारताच्या दहशतवाद-विरोधी युद्धाच्या समर्थनार्थ वातावरण तयार होण्यासाठी प्रार्थना होणे, आवश्यक नाही काय? आमच्या देवता आणि देव केवळ व्यक्तिगत स्वार्थांच्या पूर्तीचे माध्यम आहेत काय? राष्ट्राच्या सुरक्षेसाठी त्यांना आवाहन करून जन-गण-मनाची शक्ती मजबूत करणे आणि जन-संघटनेतच ईश्वराचे दर्शन करणे अध्यात्माच्या विरुद्ध होईल काय? जर असे असेल तर, अशा स्वार्थ-केंद्रित अध्यात्माला तिलांजली देऊन राष्ट्र-केंद्रित अध्यात्माची भावना निर्माण करण्याकडे वाटचाल करावी लागेल.
(लेखक, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शोध संस्थान, नवी दिल्लीचे निदेशक आहेत.)
अनुवाद : श्रीनिवास वैद्य

No comments: