Thursday, February 25, 2010

प्रेरानेवर आघात

राजस्थान शासनाने शैक्षणिक अभ्यासक्रमातून गाळण्यास सांगितलेला काही भाग पुढीलप्रमाणे
इयत्ता 9 वीचे "सामाजिक विज्ञान'
पहिल्या धड्यातील "वैदिक सभ्यता विश्व की प्राचीनतम... सभ्यता है', हा परिच्छेद गाळावा.
सातव्या धड्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे लिखाण गाळावे.
आठव्या धड्यातील "प्राचीन भारतीय आर्थिक चिंतन' हा भाग गाळावा.
इयत्ता 10 वीचे "संस्कृत' या विषयाचे पुस्तक
"स्वराष्ट्रम्‌।' हा 4 था धडा पूर्ण गाळण्यात यावा.
"वीर सावरकर।' हा 11 वा धडा संपूर्ण वगळावा.
"कुंभमेळा।' हा 12 वा धडा वगळण्यात यावा.
ई "अपठितावबोधनम्‌।' मधील "संघे शक्तिः कलौयुगे' (अर्थ ः कलियुगात संघशक्ती महत्त्वाची आहे.) हे वाक्य धड्यात जिथे जिथे असेल, तेथून ते काढावे.
"पत्रलेखनम्‌।' या भागातील "भारती संस्कृतपत्रिका' ऐवजी "स्वरमंगला संस्कृतपत्रिका' असे म्हणावे.
"शब्दाधारितवाक्यानां निर्माणम्‌' यामधील "लक्ष्मणः रामस्य भ्राता।' (अर्थ ः लक्ष्मण हा रामाचा भाऊ आहे.) याऐवजी "श्यामाः रमेशस्य भ्राता।' (अर्थ श्याम हा रमेशचा भाऊ आहे) असे वाचावे.
इयत्ता 11 वीचे "संस्कृत' या विषयाचे पुस्तक
"भरतस्य मोहः।' हा संपूर्ण धडा गाळावा.
"वेदोपदेशः।' हा संपूर्ण धडा गाळावा.
"संघे शक्तीः' असेल तिथे "संगठने शक्तिः' म्हटले जावे.
"चंद्रगुप्त' हा 13 वा धडा पूर्ण गाळावा.
"उत्तिष्ठत जाग्रत।' (अर्थ ः ऊठ, जागा हो!) हा 14 वा धडा पूर्ण गाळावा.
वरील प्रमाणेच रामायण, वाल्मिकी ऋषी आणि संस्कृत भाषा यांचे महत्त्व सांगणारी वाक्ये काही पाठांतून वगळण्याचा आदेश आहे.
इयत्ता 11 वीचे "राजनीती विज्ञान' या विषयाचे पुस्तक
7 व्या धड्यातील क्रांतिकारकांच्या साहसाच्या संदर्भातील वाक्ये गाळण्यास सांगितले आहे.
11 व्या धड्यातील "विनायक दामोदर
सावरकर' या नावाच्या अंतर्गत जे काही असेल, ते सर्व गाळावे.
***

No comments: